आठवणीतली कविता: “हळूच त्यातून सटकायचं”

माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे पापड, कुरडया करण्याचा कार्यक्रम असायचा. आमच्या वाड्यात आजी, आणि तिच्या मैत्रिणी, आई, काकू, वगैरे अंगणात पापड, कुरडई वगैरे लाटायचे. मग ते वाळत घालणे, वळवाचा पाऊस आला की उचलणे ही कामं आम्हा मुलांची असायची.  त्यावेळच्या अनेक आठवणींपैकी एक ठळक आठवण म्हणजे, माझ्या आजीची एक मैत्रीण होती, तिला "य" आजी म्हणू... ती कविता, गाणी... Continue Reading →

“संदीप, वैभव…आणि कविता” विषयी…

काल रात्री मी "संदीप, वैभव...आणि कविता" हा कार्यक्रम पाहिला. लहानपणी शाळेत असताना कविता हा माझ्या आवडीचा विषय अजिबात नव्हता. त्याला कारण, पु.ल. देशपांडे यांनी "बिगरी ते मॅट्रीक" मध्ये सांगितल्याप्रमाणे, आमचे शिक्षक. त्यांना ज्यापद्धतीने "खबरदार जर टाच मारूनी याल पुढे..." ही कविता शिकवली होती त्याहून वाईट पद्धतीने आम्हाला आमच्या शिक्षकांनी कविता शिकवल्या. म्हणजे कवितेबद्दल तिटकारा निर्माण... Continue Reading →

माझ्या आवडत्या लेखिका / कवयित्री – शांता शेळके

मराठी मधले काही मोजकेच लेखक मला आवडतात. एका प्रकारचे असं नाही तर विविध विषयांवर लिहिणारे. उदाहरणार्थ: पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, य. दि. फडके., विजय तेंडुलकर, जयंत नारळीकर, जी. ए. कुलकर्णी. काही मर्यादीत प्रमाणात जयवंत दळवी आणि गिरीश कुबेर. ऐतिहासिक कादंबरी लिहिणारे लेखक किंवा अजून "लोकप्रिय" प्रकार लिहिणारे लेखक मला अजिबात आवडत नाहीत. रणजित देसाई, शिवाजी सावंत,... Continue Reading →

“प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे?”

नुकताच मला व्हॉट्स ऍप वर एक कविता आणि त्यासंबंधी एक मेसेज आला. समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही वीस कडवी म्हणजे २० रत्न आहेत. आणि त्याखाली "Be Balanced" असा उपदेश होता. कविता खरोखरच चांगली होती, पण भाषा त्यामानाने नवीन(१९ व्या शतकातली) वाटली. १७ व्या शतकातली नाही. आणि रामदास स्वामींच्या शैलीशी मिळतीजुळती तर अजिबात नाही.... Continue Reading →

Latest Song by Lata Mangeshkar

I received this message and the song on WhatsApp group. The latest song of Lata Mangeshkar. Sung whilst nearing her 89th birthday. It's in Marathi and is about how she is resting now and reminiscing about the past and hoping she will have same known faces near her, in her next birth, as near and... Continue Reading →

मोबाईलच्या अती वापरासंबंधी मनास केलेला उपदेश (मनाचे श्लोक )

मोबाईलच्या अती वापरासंबंधी मनास केलेला उपदेश (मनाचे श्लोक )... ******************* मना फेसबुकने असे काय केले तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले मना त्वा चि रे मित्र ही वाढविले तया तोंड देणे आता प्राप्त झाले ।।१।। मना नेट रात्रीस खेळु नको रे सुखी घोर निद्रेस टाळु नको रे नको रे मना रात्रिला जास्त जागु नको तु असा... Continue Reading →

विरंगुळा: वात्रटिका

नवरा: पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी भले लागू दे शिकाया लसावि, मसावि बायकोचे उत्तर: बनून आता गोसावी जी आहे ती सोसावी विसरून लसावि, मसावि घरची भांडी घासावी!

Blog at WordPress.com.

Up ↑