कोणी तरी एका वकीलाला विचारले, “महाभारत आणि रामायण यांमध्ये कोणता फरक आहे?”
वकीलाने एकदम वकिली भाषेत उत्तर दिले:
“महाभारतामध्ये जमिनी बद्दल वाद होता तर रामायण ही अपहरणाची (kidnapping) केस होती.”
हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील मराठीच्या प्राध्यापकांना विचारला तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते:
हरणाचं वस्त्र बनवण्यावरून झाले ते रामायण
आणि
वस्त्राचं हरण करण्या वरुन झाले ते महाभारत!

Leave a comment